My Life.... My LITTLE World
ONLY FOR MY BELOVED ONES......
Wednesday, January 04, 2023
तुझी आठवण
Sunday, November 03, 2019
ती संध्याकाळ
Sunday, September 29, 2019
पावसाचं गाणं...
पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस
तुझी आणि माझी.... भिजण्याची हौस.
तुला आवडते भिजणे चिंब, मला मात्र थेंब अन थेंब
न्हाऊन निघतो दोघेही आपण....
फरक फ़क्त भिजण्याचा,
तू म्हणतेस "जाऊदे आता" अन मी म्हणतो' "नको ना जाऊस"
पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस
तुझी आणि माझी.... भिजण्याची हौस.
सरीवर सरी आणि गंधाळलेली गात्र
वीजांचा कड़कड़ाट आणि काळीकुट्ट रात्र
शब्दांतील श्वास आणी श्वासांमधले अंतर
कलहाच्या ओलाव्यात भिजून जाते मात्र.... फरक फ़क्त भिजण्याचा
तू म्हणतेस "जाऊदे आता" अन मी म्हणतो' "नको ना जाऊस"
पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस
तुझी आणि माझी... भिजण्याची हौस.
Monday, August 31, 2015
ईशारे
तुला मधाळ हसताना पाहून
चंद्रकोरही लाजायची
दबक्या पावलांनी ऐकलं की
तुझी पैंजणेही वाजायची
ईशारेच होते फक्त ईशा-र्यांत जेव्हा
गालीचीही लाली तुझ्या खळीमध्ये दिसायची.
Sunday, March 08, 2015
तुला पाहता....
तुला पाहता वाटले वेलीला... जन्म हा माझा फुका न गेला
अंकुरण्याचा दिवस गुलाबी... फुलतानाही सलून गेला.
फुलली तेव्हा रम्य सकाळी.... आसमंत दरवळून गेला..
तुज सामोरी पाहून आणिक.... गंध तयाचा जळून गेला.
डौलत डोलत उभे राहिले वार्यावरती फुल बहरले....
किरणांनी ही सोने लुटले... तरी न वेलीस बरे वाटले...
तुला पाहता वाटले वेलीला... जन्म हा माझा फुका न गेला
अंकुरण्याचा दिवस गुलाबी... फुलतानाही सलून गेला.
बिंदु होता ओठांवरती किरणांनी लुटल्या सोन्याचा
डौलत होता वार्यावरती.... साज तुझ्या रेशीम केसांचा.
लटेतला एक केस मोकळा... गालांवरती तरसत होता...
जसा उन्हाचा एक कवडसा... आनंदाने बरसत होता.
वेलीसही त्या कळून चुकले... आभाळही हे असेच झुकले
सौंदर्याने तुला मढविले... मनाशीच मग मला रडविले.
जन्म हा माझा असा वेलीचा.... फुल प्रीतीचे फुलवून गेला
केसांत खोवशील या आशेने... नशिबास या झुलवून गेला...
फुलुन येईन पुन्हा एकदा... चंग मनाचा गळुन गेला
अंकुरण्याचा दिवस गुलाबी... फुलतानाही सलून गेला.
तुला पाहता वाटले वेलीला... जन्म हा माझा फुका न गेला
अंकुरण्याचा दिवस गुलाबी... फुलतानाही सलून गेला.
दिनांक : 16 फेब्रुवारी 2015
वेळ : पहाटे 01.10
कवी : योगेश साळवे
Tuesday, April 22, 2014
Tuesday, September 17, 2013
एक सुंदर प्रेमकथा
अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत.अंकीताला वाचनाची आवड आहे तर शुभमला मोबाईल चॅटची..वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुन बसलाय.अंकीता त्याला सहजच म्हणते,i love u.हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..
अंकीताःयाची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहीजे.आ...णि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस.जे मला हवं असतं.आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक कितीवेळा वाचशील?
अंकिताःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमःछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीताःi know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..तोच इथे सुरु होतोय.चला तर मग तोच अनुभवुया.काही दिवसांनंतर
रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवर आलीच नाही गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.
तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँत कुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज सोडला नाही.थोडा विचार केल्यावर त्याला एक गोष्ट आठवते.तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन गेलीय.त्याला ती वाचत असलेल्या रोमियो ज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते पाहायचंय.जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतं त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.आज तातडीने यायला सांगितलंय.मला माझं नशीब आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात आहे....तुझी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्टेशनपर्यँतचं
तो म्हणाला,काय?
तीःते तु अंकीतालाच विचार..ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतला होता.शुभमला सोडुन न जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,अंकीता नाही...
मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो.मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो.frnds मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही.मला फक्त एवढंच सांगायचंय."दिलके मामले में हमेशा दिलकी सुनो,ना की दिमागकी"...♥♥♥
Monday, February 11, 2013
मेरी मोहोब्बत...
अभी कुछ दिन मुझे मेरी मोहोब्बत आजमाने दे ...
इस दिल की खामोशी को लहू बनाके उडाने दे ...
सुना तो था ही के उठता ही है लहु खामोशी संग एक दिन ...
वो पल भी तेरी मोहोब्बत का अब मुझे भी आजमाने दे ...
Friday, January 04, 2013
प्रेम...
प्रेम...
प्रेम सगळेच करतात. सगळ्यांवर करतात. मग ते बालवयातले असो , कुमारवयातले असो वा तरुणपणातले असो शेवटी प्रेम या शब्दाचा अर्थ वरील तिन्ही पायऱ्यांमध्ये एकच असतो. प्रेम या अडीच अक्षरी शब्दासारखा दुसरा कोणताच शब्द नाही .
वास्तवाला विसरून स्वप्नांत रंगणं हा प्रत्येकाचा स्वभावच असतो. रंजक गोष्टीत मन रमत रमत एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं. कल्पनेच्या पंखांनी स्वप्नील आकाशात भरारी घेऊ लागतं. अशावेळी सुखा बरोबरच दुखाचा स्पर्श मनाला होतो.
प्रेम ही एक भावसमाधी आहे. अथांग गहिरी !! प्रेम म्हणजे निरंतर विकास ! त्या वाटचालीत माणसाचं मी पण गळून पडतं. अहंचे कंगोरे बोथट होतात. दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी जगण्यातला निखळ निरामय आनंद काय असतो हे प्रेमात पडलेली व्यक्तीच अनुभवू शकते.
एखाद्याला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम ! हे स्वीकारणं कोणी लादलेलं नसतं. कोणताही मतलब त्यामागे भासत नाही. प्रेम म्हणजे निष्ठा , गाढ विश्वास : एक तरल मुग्ध भावना .... ज्याचे अस्तित्व माणसाला सर्वार्थाने संपन्न करत असते.
प्रेमात शांती आहे. स्वतासाठी असा एक अवकाश आहे. प्रेम हे एक सुख आहे. प्रेम हा एक विश्वास आहे. प्रेम हा एक सहवास आहे. ती व्यक्ती दूर गेली तरी.... तिच्या धुंद आठवणींचा
अनामिक
वरवर माझे पटते तरीही कुठेतरी मी आत खटकतो
अनोळखीसा कुणी चेहरा मजला आरशातून हटकतो
चैतन्याने सळसळनारा शब्द विजेचा कसा धरावा
चपळ क्षणांचा रंगीत मासा सुळकन हातातून निसटतो
हजार दारे उघडी होती माझ्यासाठी पसरून बाहू
न कळे कुठल्या विचारात मी अजून दारोदार भटकतो
नियतीने जखडून टाकली आभाळाची उमेद माझी
संध्याकाळी पतंग तुटका तारेवरती खिन्न लटकतो
हताश माझ्या रित्या मनाला हवाच थोडा विरंगुळाही
कधी कधी मग मी देवाच्या फोटोवरची धूळ झटकतो
Sunday, June 10, 2012
तुझ्या माझ्या सवे कधी
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा बरसायचा पाऊसही
भिजलेल्या मना माझ्या आठवतं ना तुला
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा असायचा पाऊसही....